मुख्य सामग्रीवर वगळा

साक्षात्कार बावाजीच्या लीला

 










संतती योग


मनकर्णिकबाई साऊरकर ह्या बेलूरकरांच्या आजी. रा. मो. बेलूरकांचे लग्नाला बारा वर्षे झालीत. पण संतती नाही. म्हणून म्हाताऱ्यांची मने थोडी दुःख होती. एक दिवस मनकर्णिकाबाई समर्थाचे दर्शना करिता आल्या. भक्तसंकटमोचन शांत बसले होते. मनकर्णिकाबाईने जाता बरोबर समर्थांचे पूजन केले. पाय धरले आणि मनोकामना आपल्या अंतरीच प्रगट केली. तसेच महाराज म्हणाले - 'बीज  अंकुरले । रोप वाढिले ।' खरोखर तसेच झाले. पुढे अल्पावधीतच पुत्ररत्न प्राप्त  झाले. मनकर्णिकाबाईस आनंद झाला. असा आहे. समर्थाचा पुण्यप्रताप तशी मनकर्णिकाबाईची समर्थांचे चरणी अपूर्व श्रध्दा. यामुळे अधिकच दुणावली. आसवां


अशाच प्रकारे धनोडीचे श्रीराम नारायणराव देशमुख यांचे बरेच दिवसाचे लग्न झाले पण संतती नाही. तथापि त्यांचा पूर्ण विश्वास होता की, समर्थ आपले येथे वंशदिवा लावेलच. याप्रमाणे एक दिवस हे टाकरखेडला आले. समर्थांचे दर्शन घेतले. पूजन केले. पत्नी सौ. जिजाबाई सोबत होत्या. त्यांनीही समर्थांचे पूजन करून नमस्कार केला. समर्थांनी जिजाबाईचे पदरात एक फळ टाकले. तोच एक वर्षानी बाळाचा जन्म झाला. आज तोच श्रीरामपंत देशमुखांचा कुलदिपक किशोर म्हणजे समर्थांची कृपा. 


परमार्थ साधनेकडे ओढ


शेती व गुरे राखण्याचा व्यवसाय. महिने व रोजदारीची कामे करणे शेण काढणे, पाणी भरणे, मालकांनी सांगितलेली कामे करणे हे लहानुने सात, आठ वर्षे केले. तसा लहानुचा स्वभावच लहानपणा पासुनच सरळ, गोड, मितभाषी व कुणाचेही मन न दुखविणारा. सेवाभावी. लहानू खुदच समजदार असल्याकारणामुळे तो निर्व्यसनी व निर्व्याज्य होता. खेडूत व गावंढळ मुलाबरोबर राहूनही त्याला त्यांचा संसर्ग बाधू शकला नाही. वाईटाचे अनुकरण कधी केले नाही. काट्यामध्ये फुल उमलावे अशी स्थिती लहानुची. अनुकरण केले असेल तर थोरांचे.


“आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी।” हे संत तुकारामांचे वचन त्यास सत्यसुखाचा शोध घेण्यासाठी सांगत होते. नित्याची संसारातील कामे गोड वाटत नव्हती. परमार्थ साधनेत मन रमत होते.


 जन्माला कशाला आलो? करायचे काय? या नरदेहाचे मूल्य काय? इत्यादि गोष्टीचे चिंतन करून आपली मनोविचार दीप्ती स्वतःच प्रदीप्त केली. आता जीवनात योग्य परिवर्तन घडून आणल्याशिवाय खरे सुखप्राप्त होणार नाही व संचित असेल तशीच भावना. मानवी जीवन म्हणजे प्रभातीचा तारा. आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी व विशाल ध्येय सफल करण्यासाठी व्यक्तीभावाच्या पलीकडे जायला हवे. निरंहकारी व्हायला हवे, खऱ्या सुखाचे दानी संत आहेत.


संतांचिया सहज संगती ।सद्‌बोधाची फळे लाभती । प्रवृत्ती ते होय निवृतती। अंतरंगी ।। ग्रामगीता



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Lahanusadhana app (hereby referred to as "Application") for mobile devices that was created by (hereby referred to as "Service Provider") as a Free service. This service is intended for use "AS IS". Information Collection and Use The Application collects information when you download and use it. This information may include information such as Your device's Internet Protocol address (e.g. IP address) The pages of the Application that you visit, the time and date of your visit, the time spent on those pages The time spent on the Application The operating system you use on your mobile device ...and more. The Service Provider may use the information you provided to contact you from time to time to provide you with important information, required notices and marketing promotions. For a better experience, while using the Application, the Service Provider may require you to provide us with certain personall...

वं.राष्ट्रसंतांचे मोठे गुरुबंधु समर्थ लहानुजी महाराज,टाकरखेडा

  // ॐ शिवरुपाय विद्महे  लहानुजी देवाय धीमही तन्नो सुर्योपासक प्रचोदयात //                

चलती के सब है प्यारे

  चलती के सब है प्यारे बिगडी को कौन सुधारे ? कोई मिले , सखी के लाल भले! ||टेक|| जब तक ज्वानी का भर है तब तक ही नारी तर है  अब इन्द्रिय पाँव पसारे तब कोई सुने न हमारे   कोई मिले , सखी के लाल भले! ||१|| जब जर जेवर है कर मे तब मित्र बने घर-घरमे धन गया - न कोई पुकारे सब भग जाते डर सारे कोई मिले , सखी के लाल भले! ||२|| जब सत्ता पास रहेगी  तब हाँजी -हाँजी होगी  जब चुनाव मे जा हारे कुत्ते नही जाय पुकारे । कोई मिले ,  सखी के लाल भले! ||३|| जब तप का बल हैं भारी ।  तब झुण्ड पडे नर- नारी तप भ्रष्ट भीख नही डारे  घुमते रहो मारे -मारे   कोई मिले  सखी के लाल भले! ||४|| यह तुकड्या ने कहलाया ।  सब प्रभु की छायी माया ।  जब सत्गुरु किरपा तारे ।  तब दुनिया चरण पखारे ।।  कोई मिले ,  सखी के लाल भले ! ॥५ ।।  सुरत ,  दि . १२ - ९ -६२