मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रसंत व लहानुजीबाबा

 // द्वय गुरुबंधु //



तुम्ही दूर पर्यंत दिवे लावाल !


श्रीसमर्थ लहानुजी महाराजांच्या भेटीस मधून मधून वं. तुकडोजी महाराज येत असत. या गुरूबंधूचे नाते नातेवाईका प्रमाणे नव्हते. वं. तुकडोजी महाराज व वरखेड क्षेत्रातील काही मंडळी मिळून टाकरखेडला आली. वं. तुकडोजी महाराज बाहेर दारावरच असतील तर आत लहानुजी महाराजांची हालचाल चालू झाली. दर्शनप्रेमीही आले होते. त्यांन काढून दिले. बाबांनी म्हटल्यावर कोणी थांबत नव्हते त्यांचे पुढे. कारण त्यांचे वाग्बाण म्हणजे "जब बाण छूटे शब्द के, लागे हृदयथरकापने।" (ल. ब.) पुष्कळांना महाराजांच्या शब्दांचा गोड व कटू अनुभव आल्याकारणामुळे त्यांचा शब्द सहसा कोणी मोडित नसे. त्यामुळे पुष्कळदा सेवकांची गरज न पडता योग्य वातावरण तयार होत होते. बाबा स्वगतच गुणगुणायला लागले. "आपले येथे तर आज कवी नारायण आलेत ! आदिनारायण आलेत !!" वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ते 'कवीनारायण' म्हणायचे. वं. महाराज आत गेले. समर्थास पुष्पमाला अर्पण केली. वं. तुकडोजी महाराजांचा हातधरून समर्थांनी आदर दृष्टीने खाली बसविले आणि सकुशल विचारू लागले.


"कसे काय येणे झाले?"


"आपल्या भेटीकरिता !"


वं. तुकडोजी महाराजांच्या वाणीतून बंधूप्रेमाचा व वात्सल्याचा गोडवा ओसंडत होता आणि दोघेही एकमेकास आत्मवतदृष्टीने सारखे पहात होते.


"माझ्या जवळ काय आहे बाबा?"


"अहो ! त्या श्रीसद्गुरू नाथांची पूर्ण अमानत जमा आहे तुमच्या जवळ ! तुम्हास काही कमी नाही या त्रिखंडात !"


एवढे बोलून दोघांनीही परस्पर मनोभावे वंदन केले. श्रीसमर्थ लहानुजी महाराज राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजासी सरळ व सहज बोलत असे. कुशल विचारीत असे. त्यांची नित्याची स्थिती त्यावेळेस रहात नसे हे त्यांचे बंधुप्रेम. श्रीसंत तुकडोजी महाराज निघून गेले की, पुन्हा बाबा पूर्ववत स्थितीत यायचे.


"अहोपण ! आपला होता तो तर निघून गेला. आपले कसे काय होईल ?" लहानुजी महाराज म्हणाले. आत्मस्थितीत गढून गेलेला महापुरूषही राष्ट्राची चिंता बाळगतो. वरील शब्द गांधी खुना विषयी होते.


"तुम्ही सांगाना काय करावं आपण तर?"


"काही नाही, ह्या सर्व देशाचा कारभार व व्याप तुमचेच खांद्यावर आहे. हे सर्व तुम्हाला सांभाळावं लागणार आहे !"


"माझेकडून कसे सांभाळणे होईल बाबा ?"


"अहो ! ते सर्व होते. त्या सद्गुरूची मोठी कृपा आहे तुमच्या पाठीमागे. अन् हेच नव्हे तर तुम्ही दुरपर्यंत दिवे लावाल !"


"होय बाबा ! आपणा दोघांचेही पाठिमागे सद्गुरूनाथ सदैव उभे आहेत." श्रीलहानुजी महाराजांनी व राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी परस्परास प्रणाम

केला. राष्ट्रसंतांनी कडूकडे भोजन केले व विश्रांती करून निघून गेले.


वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "जपानसारख्या पाश्चात्य देशात मी विश्वधर्म व विश्वशांती परिषदेस जाईन हे मला स्वप्नातदेखील आठवत नव्हते. ही सर्व सद्गुरूनाथांची कृपा !"


राष्ट्रसंत विश्वधर्म परिषदेमध्ये गेल्यावरत भारतवर्षाचे नाव चीरस्थाई करून ठेवले आणि अठरा देशाच्या विश्वधर्म परिषदेचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त झाले. राष्ट्रसंतांचे विश्वसंत बनले. सन १९४८ मधील श्रीलहानुजी महाराजांचे वचन सन १९५५ मध्ये सत्य झाले.


संदर्भ :-  जीवन - दर्शन 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Privacy Policy

  Privacy Policy This privacy policy applies to the Lahanusadhana app (hereby referred to as "Application") for mobile devices that was created by (hereby referred to as "Service Provider") as a Free service. This service is intended for use "AS IS". Information Collection and Use The Application collects information when you download and use it. This information may include information such as Your device's Internet Protocol address (e.g. IP address) The pages of the Application that you visit, the time and date of your visit, the time spent on those pages The time spent on the Application The operating system you use on your mobile device ...and more. The Service Provider may use the information you provided to contact you from time to time to provide you with important information, required notices and marketing promotions. For a better experience, while using the Application, the Service Provider may require you to provide us with certain personall...

वं.राष्ट्रसंतांचे मोठे गुरुबंधु समर्थ लहानुजी महाराज,टाकरखेडा

  // ॐ शिवरुपाय विद्महे  लहानुजी देवाय धीमही तन्नो सुर्योपासक प्रचोदयात //                

चलती के सब है प्यारे

  चलती के सब है प्यारे बिगडी को कौन सुधारे ? कोई मिले , सखी के लाल भले! ||टेक|| जब तक ज्वानी का भर है तब तक ही नारी तर है  अब इन्द्रिय पाँव पसारे तब कोई सुने न हमारे   कोई मिले , सखी के लाल भले! ||१|| जब जर जेवर है कर मे तब मित्र बने घर-घरमे धन गया - न कोई पुकारे सब भग जाते डर सारे कोई मिले , सखी के लाल भले! ||२|| जब सत्ता पास रहेगी  तब हाँजी -हाँजी होगी  जब चुनाव मे जा हारे कुत्ते नही जाय पुकारे । कोई मिले ,  सखी के लाल भले! ||३|| जब तप का बल हैं भारी ।  तब झुण्ड पडे नर- नारी तप भ्रष्ट भीख नही डारे  घुमते रहो मारे -मारे   कोई मिले  सखी के लाल भले! ||४|| यह तुकड्या ने कहलाया ।  सब प्रभु की छायी माया ।  जब सत्गुरु किरपा तारे ।  तब दुनिया चरण पखारे ।।  कोई मिले ,  सखी के लाल भले ! ॥५ ।।  सुरत ,  दि . १२ - ९ -६२