मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेल्वे प्रवासातील गुंडांच्या तावडीतून बाबांनी वाचवले

             // सद्‌गुरु समर्थ लहानवें नम : // श्री. सुरेशराव रघुपतीराव देशमुख टाकरखेड आर्वी यांचेवर ओढवलेला प्रसंग जाको राखे साई, मार सकेना कोई || हिन्दीतील वरील वाक्प्रचारासारखाच प्रसंग माझेवर आला असता समर्थ लहानुजी बाबांनी माझे कसे प्राण वाचविले त्याबाबतचा हा लेखन प्रपंच… साधारणत: सन १९७३-७४ मधील ही घटना आहे. आजही ती घटना जणू काही काल परवाच घडून गेली इतकी ताजी आहे. घटना कशी घडली त्याचे सविस्तर वर्णन… माझी चुलत बहीण सौ. लताताई भाऊसाहेब पवार, भडगांव जि. जळगांव ( खानदेश ) हिला दिवाळी निमित्त्य घ्यायला जायचं होते. पुलगांव ते जळगांव साधारणतः सात - आठ तासांचा प्रवास होता. रात्री ११. ३० वाजता पुलगांववरुन बसायचं ठरलं. रात्रीच्या गाडीला वेळ असल्यामुळे जेवणाचा डबा आणला होता जेवण केले. गाडी बरीच लेट होती. जशी गाडी स्टेशनवर आली तशीच प्रवाशांची गर्दी अतोनांत झाली. माझ्याकडे जनरलची तिकिट होती. थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वच डब्याचे दरवाजे बंद होते कुणीही दरवाजे उघडत नव्हते. एवढ्यात गाडी सुटण्याची वेळ झाली व गाडीने हळूहळू वेग धरायला सुर...

लहानुबाबा दीन दु:खीतांचे कैवारी

    लहानुबाबा दीन दु:खीतांचे कैवारी दुःखीतांचे कैवारी श्रीसमर्थ लहानुजी महाराजामध्ये सद्गुरू कृपेने आत्मज्ञानाची फळे यायला लागली. निष्काम सेवेने जनप्रिय झाले. "जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्य सांभाळावी" आहे मन निर्विकारी झाले. चित्तचतुष्ट निरोधन केले. आत्मरत वृत्ती झाली. जगती जनार्दन ।। दिसायला लागला. दीनदुःखीतांच्या क्लेशात सहभागी व्हायला लागले. गंगापूर । क्षेत्री वनौषधी देऊन कित्येकांना व्याधी मुक्त केले. त्यात धन्यता वाटायला लागली. संतांची पायवणी घेण्यास जनमनाची लाज मानली नाही. शरीर कष्टवून जेवढा परोपकार करणे शक्य होईल तेवढा परोपकार करायचे. देवपूजा, राऊळी परिक्रमा, एकादशी करणे, व्रत उद्यापनासारखे धार्मिक विधिकृत्ये कमी झाली. उलट मंदिराकडून कोणी जाणारा पांथस्थ भेटला तर त्याची विचारपूर करायचे. त्याचे जवळ ओझे असेल तर ते आपणाकडे घेऊन त्यांचा भार हलका करायचे. आपलीच स्वतःची धड सोय नाही, पायही लांब होऊ शकत नाही एवढी जागा, पण त्या मर्यादित कुटिचे गंगापूर स्थळी पथिकास ते आसरा द्यायचे. प्रवाशास कुणाचे घर पाहिजे असेल तर ती व्यवस्था करायचे. सोय नसेल तर आपणाकडे आश्रय द्यायचे. ते म...

राष्ट्रसंत व लहानुजीबाबा

  // द्वय गुरुबंधु // तुम्ही दूर पर्यंत दिवे लावाल ! श्रीसमर्थ लहानुजी महाराजांच्या भेटीस मधून मधून वं. तुकडोजी महाराज येत असत. या गुरूबंधूचे नाते नातेवाईका प्रमाणे नव्हते. वं. तुकडोजी महाराज व वरखेड क्षेत्रातील काही मंडळी मिळून टाकरखेडला आली. वं. तुकडोजी महाराज बाहेर दारावरच असतील तर आत लहानुजी महाराजांची हालचाल चालू झाली. दर्शनप्रेमीही आले होते. त्यांन काढून दिले. बाबांनी म्हटल्यावर कोणी थांबत नव्हते त्यांचे पुढे. कारण त्यांचे वाग्बाण म्हणजे "जब बाण छूटे शब्द के, लागे हृदयथरकापने।" (ल. ब.) पुष्कळांना महाराजांच्या शब्दांचा गोड व कटू अनुभव आल्याकारणामुळे त्यांचा शब्द सहसा कोणी मोडित नसे. त्यामुळे पुष्कळदा सेवकांची गरज न पडता योग्य वातावरण तयार होत होते. बाबा स्वगतच गुणगुणायला लागले. "आपले येथे तर आज कवी नारायण आलेत ! आदिनारायण आलेत !!" वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ते 'कवीनारायण' म्हणायचे. वं. महाराज आत गेले. समर्थास पुष्पमाला अर्पण केली. वं. तुकडोजी महाराजांचा हातधरून समर्थांनी आदर दृष्टीने खाली बसविले आणि सकुशल विचारू लागले. "कसे काय येणे झाले?...

संत रघुनाथबाबांचे अनुभव / साक्षात्कार

  लहानुभक्त आर्वीचे संत रघुनाथबाबा आर्वीस प्रथम शुभास्तेपंथान हिवाळी दिवस. कार्तिक मास तो. जिकडे तिकडे सर्व आबादीचे वातावरण, शेतकरी आपली कामे आटोपून पुढे येणाऱ्या पिकाची वाट पहात होते. तिथे याच महिन्यात रघुनाथबुवांनी भागवत सप्ताह आरंभिला. रघुनाथबाबा विव्दान, श्रध्दाळू व कर्मकांडात प्रविण माणूस. बाबांच्या पदांबुजी अगाध प्रेम रघुनाथबोवाचे. आपल्या भागवत सप्ताहाची समाप्ती श्रीलहानुजी महाराजांच्या पावन उपस्थितीत व्हावी ही आत्मिक तळमळ. पण या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार कोण या नरसिंहरूपास ? कुणाची प्राज्ञा आहे पुढे येण्याची? पण सद्भक्तांचा हेतु समर्थांनी ताडला. इकडे रघुनाथबोवा आतल्याआत तळमळत होते. तसेच टाकरखेड क्षेत्राच्या ठिकाणी हे ब्रह्मर्षी तळमळत होते. शेवट मनातील भक्तप्रेमाचा आवेग असह्य झाला. बाबा म्हणाले की, "उद्या आपल्याले आर्वीले जायचे आहे ! रेंगी-बैल तयार करा !" सेवक मंडळी भ्रमात पडली. स्थिरतत्वज्ञ महाराज टाकरखेडला कडूकडे आले तेव्हापासून कुठेही गेले नाहीत. आता कशाला जाणार आवींला? हे काही तरी नेहमीप्रमाणे गुणगुणत असावे म्हणून सेवकांनी व कडूंनी दुर्लक्ष केले. निश्चिंत राहिले. ...

लहानुसेवक स्व. रामदासजी कळंबे अनुभव / साक्षात्कार

लहानु सेवक स्व. रामदासजी कळंबे  संकट मोचन नाम तिहारो सेवक रामदास कळंबे एकवर्ष घरादाराचे दर्शन न घेता सेवा करू लागला. पत्नी सौ. विठाबाई त्या दिवशी फार बेचैन होत्या. नाड्या सुटल्या. मृतशय्येवर काढले. रामदासला निरोप आला. रामदास म्हणजे निग्रही सेवक. समर्थाचे आज्ञेविणा जायचे नाही व आपण परवानगीही मागायची नाही. "परदुःख द्रवही संत सुपुनिता" या त्रिकालज्ञ संतास हा सगळा प्रकार कळला. तेच म्हणतात - "रामदास तू आज घरी जा !" कळंबे उंबरखेडला जाण्यासाठी निघाले. वरदेला थोडे पाणी होते. केवटाने नाव टाकली. पार करून दिले. घरी गेले नसेल तर वरदा दोथडी तुडुंब भरली. घरात रडारड सुरू होती. श्रींचा तीर्थप्रसाद व अंगारा दिला. हेमगर्भाची मात्रा दिल्याप्रमाणे तेव्हाच पत्नी शुध्दिवर आली. पुढे समर्थांचे आज्ञेप्रमाणे रामदास दररोज येणे जाणे करायचा ! सौ. विठाबाईची प्रकृती पूर्ण बरी झाली. रामदासाची पूर्ववत् सेवा सुरू झाली. पुढे दिवाळी आली. महाराज म्हणतात "आप अपने घरको पंधरा दिनके लिये जाईये।" हिंदीमधून बोलले. टाकरखेडचे प्रेमी लोकांनी आग्रह केला. लक्ष्मीपूजन करून जा. शिरपुरचे गुलाबराव रंगारी व ...

स्व. माधवरावजी लादे ; सातरगांव अनुभव / साक्षात्कार

  लहानुभक्त स्व. माधवराव लादे ; सातरगांव  सुदैवाचा ठेवा माधवराव लादे हे सातरगावचे राहणारे. साधा, भोळा माणूस तपोनिष्ठ श्रीलहानुजी बाबांच्या प्रखर कीर्तीमुळे हे टाकरखेडकडे वळले. माधवरावची अखंड सेवा सुरू झाली. शुध्द सेवेपायी समर्थाचे मन प्रसन्न झाले. पाचवर्षे कशी गेली आठवले नाही. "खऱ्या सेवकाची स्थिती ओळखावी । व्यवस्था पाहिजे तैशी करावी ।।" कधी कुणाशी काही न बोलणारे बाबा एक दिवस हाक मारतात- "माधवराव !" "जी बाबा !" अशी हाक देत माधवराव धाऊन आले. "तुम्ही गावी जा तुमचे काम झाले. तुमची सेवा  संपली !"  "का बरं बाबा? काही चुकले का या सेवकाकडून ?" माधवरावांना अपार दुःख झाले. आपले काही चुकले तर नसेल ना? काय झाले असेल ? समर्थांनी का म्हटले असेल असे? असे विचार तरंग उठत होते. माधवरावांचा हृदयसागर हेलावत होता. लगेच समर्थ म्हणाले - "तुमची चाकरी पूर्ण झाली. हे घ्या तुमच्या सेवेचे फळ !" म्हणून पायातील पादुका काढल्या व माधवरावांच्या स्वाधीन केल्या. माधवरावांनी त्या अमूल्य ठेव्याचा सहर्ष स्विकार केला आणि स्वामीचे चरण धरले व ढसाढसा रडू लागले. ते एक...

लहानुजी महाराज संक्षिप्त जीवन - परिचय

  श्री   संत लहानुजी महाराज ; टाकरखेड ता. आर्वी जि. वर्धा जीवन - परिचय  जपी तपी ना भजनी,  योगी आत्मालापी निजसंवादी । विदर्भभाषी अंतर्ज्ञानी | लहानुजी गमती || विसाव्या शतकांतील वैदर्भीय संतमंडळीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीसंत लहानुजी महाराजांनी श्रावणी पौणिमेस (दि. ६ ऑगस्ट १९७१) या मृत्युलोकाचा निरोप घेऊन निजधामी गमन केले ! त्या चंद्रग्रह्णाच्या दिवशी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत अनंतात विराम पावली ! जिवाजिवांना उत्क्रान्ति- पथावर आरूढ करण्याचे, त्यांच्या प्रगतीचा सोपान निविघ्न करण्यासाठी श्रमपूर्वक झिजण्याचे आपले सत्कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करीत, रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी त्यांनी 'आम्ही जातो अमुच्या गावा । अमुचा रामराम घ्यावा' या भावनेने इहलोकीचा निरोप घेतला ! जगत् हितार्थ निरलसपणे कष्टणारा एक पुण्यात्मा या मृत्युलोकावरील आपला विहार संपवून-पूर्ण करून अनंतात विराम पावला ! लहानुजी महाराज गेले ! आतां त्यांची ती पावन वाणी, परमार्थ- पथावर मार्गदर्शक ठरणारी त्यांची ती लोकविलक्षण अस्सल वऱ्हाडी मराठमोळी वाणी पुन्हा ऐकू येणार नाही ...

डाँ. सुरेशचंद्रजी चेडे ; अकोला अनुभव / साक्षात्कार

अकोल्याचे डाँ. चेडे साहेबांचे अनुभव / साक्षात्कार...... ३) @ तापडीया नगर अकोला येथे श्री संत सत्यदेवबाबांनी बावाजीचे मंदिर बांधायला लावले...... सध्याचे अकोला निवासी डॉ. सुरेशचंद्र अंबादासपंत (अण्णासाहेब) चेडे हे लहानुजी बाबांचे निःसीम भक्त. सन १९६८ पासुन डाँ. साहेब लहानुबाबांच्या सेवाकार्यात रुजु झाले. स्वतः १९७८ मध्ये ते पंजाबराव कृषी विद्यापीठ (PKV) नागपुर येथे विभाग प्रमुख व महाराजबाग प्राणीसंग्रहालय प्रमुख या पदावर कार्यरत होते. अनेक मान्यवर व्यक्ती त्यांच्या सहवासात यायच्या त्यापैकी नागपुर विद्यापीठाचे कुलगुरु कै. दादासाहेब काळमेघ ; रावसाहेब देशमुख ; डॉ.श्री. कैकणी ; लहानुदास स्व. भगवंतरावजी पावडे ; ईत्यादी मंडळी. त्याकाळी टाकरखेडला जायला व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आर्वी  वरुन पायी जावं लागायचं मुखी लहानुबाबांच नामस्मरण व भक्तांना आलेल्या अनुभवांच्या चर्चा करत टाकरखेडा गाठायचे व समर्थांचे दर्शन घ्यायचे असा नित्यक्रम सुरु होता. अशातच एकदा त्यांच्या मित्रांच्या आध्यात्मिक चर्चा सुरु असतांना असे ठरले कि व्रजेश्वरीच्या स्वामी मुक्तानंद महाराजांकडे आपण गेलो पाहीजे रेल्वे रिझर्व्हेश...

लहानुदास दिगंबर पाटील चौधरी ; देऊरवाडी अनुभव/ साक्षात्कार

लहानुदास श्री. दिगंबर पाटील चौधरी देऊरवाडी ता. दारव्हा जि. यवतमाळ यांच्या जीवन प्रवासातील चित्तथरारक प्रसंग..... २) क्षणात निसर्ग चक्रात बदल करणारा लहानुजी बाबांचा परमोच्च कोटीचा अधिकार.. सन १९७० मध्ये देऊरवाडी (लाड) ता. दारव्हा जि. यवतमाळ येथील लहानुभक्त श्री. दिगंबर पाटील चौधरी हे नेहमीच्या टाकरखेड वारीला आर्वी येथुन पायी चालत निघाले. पावसाळा संपल्यानंतरचा काळ होता. चालता चालता वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लहानुबाबांवर लिहिलेल्या एका भजनातील ओळीचे त्यांना स्मरण झाले. त्या भजनात राष्ट्रसंत लहानुजी बाबांच्या सामर्थ्याचे वर्णन करतात तू वैद्य राज से वैद्य बडा | तेरे मिट्टी मे भारी दुआ चमके || लहानुजी नाम तो छोटा है । पर काम तेरा अस्मान डरे || या वर्णनाबद्दल चौधरीजींच्या मनात शंका प्रगट झाली कि खरोखरच हे खरे असेल काय? लहानुजी बाबांना आभाळ भिते काय? हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. दिगंबर पाटील असा विचार करत करत टाकरखेड्याच्या जवळपास पोहचले अगदी थोड्याच अंतरावर मंदिर परिसर राहला होता. निसर्ग वातावरण पहाता अतिशय स्वच्छ असे वातावरण होते. पाऊस येण्याची यत्किंचीतही शक्यता नव्हती. त...